मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मकोका म्हणजे काय?

महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम ऍक्ट    मकोका म्हणजे काय ?  मकोका कधी लागतो ?   मकोका कारवाई कुणावर होते .  मकोका कारवाई झाल्यानंतर आरोपीला कोणती शिक्षा होते..   कायदा   https://youtube.com/@avirat.biradar2021?si=UHBCkTgiRKJAmA1m * मकोका म्हणजे काय :-  महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणजेच मकोका होय.  राज्य सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी मकोका कायदा हा करण्यात आला.  मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो.   * मकोका कधी लागतो :-  गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते . पण या संधीचा गैरफायदा घेऊन तो आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो . आरोपीवर अटकेची व तडीपारची देखील कारवाई होते . अशा आरोपींना अटक केली जाते तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास आरोपीवर तडीपाराची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपी मध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आह...

गुन्हेगारीला प्रवर्त करणारी शिक्षण पद्धती!

कोयता गॅंग एक भीषण समस्या  कोयता गँग ही एक समाजात भयावह समस्या बनत चालली आहे. त्यामुळे समाजात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत चालले आहे. राजधानी पासून ते  खेड्यापाड्यापर्यंत कोयता गॅंगने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. अनेक गरीब आणि चांगल्या कुटुंबातील मुले सुद्धा कोयता गँगकडे आकर्षले जात आहेत. ही गोष्ट त्या मुलांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी चिंतेचा विषय बनत आहे. * विश्वाला अहिंसेची शिकवण देणारा भारत देश *  एकेकाळी संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध भारत देशात जन्मले. भगवान गौतम बुद्धाने विश्वाला शांततेचा संदेश देऊन जगाच्या पाठीवर भारत देशाची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज लोकं धर्माधर्मात भांडून हिंसेला खतपाणी घालत आहेत भगवान गौतम बुद्धांनी धर्माबरोबरच शांती शिकवली आहे, शांती हाच धर्म आहे.  म्हणून जगाने हृदयापासून भगवान बुद्धाला स्वीकारलं आहे. आजही विश्वभरातून एकच नाद घुमतो की " युद्ध नको बुद्ध हवा "    असे शांततेचे संदेश आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये आज कुठेही दिसत नाहीत पावलोपावली दिसते ती फक्त स्पर्धा आणि स्पर्धा विद्यार्थ्यांना एकमेकांशी...

परावलंबी बनवणारे शिक्षण

स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण घेऊन शेवटी परावलंबी बनवून ठेवते ते शिक्षण काय कामाचे ?  ब्रिटिश शिक्षण पद्धतीतील म्हणजे आजच्या शिक्षण पद्धतीतील सगळ्यात मोठा दोष म्हणजे हे शिक्षण विद्यार्थ्यांना जन्मभर परावलंबी बनवत आहे . सध्याचे शिक्षण ही निव्वळ पुस्तकी ज्ञान आहे . त्यामध्ये कर्तव्याला , मनगटाच्या ताकतीला थोडेही महत्व दिले नाही , वर्गात शिक्षकांनी शिकवलेले फक्त पाठ करणे आणि 365 दिवस कागदी घोडे नाचवत राहणे याव्यतिरिक्त आजच्या शिक्षणात इतर काहीच नाही . संगीत , गायन - वादन , वकृत्व - नेतृत्व , कर्तृत्व - दातृत्व  विकसित करणारे शिक्षण   तर कधी स्वप्नातही दिसत नाही. फक्त कागदी घोडे नाचवत राहणे विद्यार्थ्यांच्या हातातील, अंगातील कला विकसित होऊन स्वावलंबी जीवन जगेल अशी शिक्षण पद्धती आज कोठेच दिसत नाही.   त्यामुळे "आपले कर्तव्य पालन करण्याचे सामर्थ्य आम्हाला लाभत नाही "   ( महात्मा गांधी ) आज उघड्या डोळ्यांनी आपण पाहतो की सकाळी दहा वाजता पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शाळेत विद्यार्थ्यांना फक्त कागद काळे करायची सवय लावली जाते, सध्या शाळेत महाविद्यालयात जे ...