मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

|| निरर्थक अभ्यासक्रम ||

  अर्थहीन असलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यावर लादणे योग्य आहे का ?  वर्षानुवर्षे चालत आलेली भारतीय शिक्षण पद्धती बदलून ब्रिटिशांनी ब्रिटिश शिक्षण पद्धती भारतीय विद्यार्थ्यांवर लादली, इंग्रज भारत देश सोडून गेल्यानंतर शिक्षण पद्धतीत सुधारणा व्हायला पाहिजे होती , परंतु आपल्या देशात शैक्षणिक सुधारणा काहीच केल्या गेल्या नाहीत , या उलट शिक्षण पद्धती अधिक गुंतागुंतीची करण्यात आली .   वास्तविक पाहता  या शाळा महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना तीळ मात्र ही उपयोग होताना दिसत नाही . पण झिरो वयोगटापासून वयाच्या 35 वयोवर्षाचा काळ हा फालतूकच्या शिक्षणामध्ये बरबाद होत आहे , केवळ वेळच बरबाद होत नाही तर या शिक्षण व्यवस्थेने काढलेल्या चुकीच्या परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांचे आयुष्य हिरावून घेत आहेत. ब्रिटिशी शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची वैचारिक शक्ती आणि सहनशीलता नष्ट झाली आहे.    * वर्षभर घेतलेल्या ज्ञानाचा केंद्रबिंदू परीक्षाच का ? *  आपल्या शिक्षणामध्ये सरकारने तयार केलेला अभ्यासक्रम शिकवला जातो, आणि त्या अभ्यासक्रमादरम्यान नको त्या प्रमाणात विद्यार्थ्...

लबाड आणि लुटारू शिक्षण व्यवस्था

सध्या शिक्षण व्यवस्थेमध्ये लबाड , खोटे - नाटे बोलून विद्यार्थी आणि पालक वर्गाला लुटत राहणे हा व्यापारच झाला आहे का ?  शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, पण हे दूध मात्र ज्यांच्याकडे धनाचा साठा भरमसाठ आहे , आणि जो छुप्या मार्गाने शिक्षण यंत्रणेला  देऊ शकतो त्यालाच हे वाघिणीचे दूध दिले जात आहे का ? असा भयानक प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे .  आज समाजामध्ये मुठभर बुद्धिजीवी लोक शिकून सवरून मोठे होत आहेत . परंतु त्यांच्यासाठी आणखीन एक परीक्षा लावली जात आहे . ती परीक्षा म्हणजे धनसंपत्ती परीक्षा !  ज्यांच्याजवळ जेवढा जास्त पैसा त्याची तेवढी जास्त गुणवत्ता ! गुणवत्तेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर त्याचेच नाव  छुप्या मार्गाने जो पैशाच्या गरम नोटा शिक्षण यंत्रणेला नेवून देईल .  वैद्यकीय , अभियांत्रिकी  महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी  वीस पंचवीस लाखापासून करोडो रुपये मोजावे लागतात . जर विचार केला तर खरंच एका विद्यार्थ्यामागे करोडो रुपये खर्च शिक्षण व्यवस्था करते का ? शिक्षण व्यवस्थेने यावर कधी आत्मपरीक्षण केलं आहे का ? अशी लाखो करोडो रुपये भरण्याइतपत सर्वसाधार...

सामाजिक विषमतेची दरी निर्माण करणारे शिक्षण :-

शिक्षण व्यवस्थेद्वारे समाजात सामाजिक विषमतेची दरी का निर्माण केली जात आहे.   आज समाजात शिक्षणामुळे माणूस घडतो असे आपण क्षणाक्षणाला म्हणतो , ते प्रत्येकाला खरे ही वाटते,म्हणून शिक्षण हे आपल्या जीवनाची पोषक तत्व आहे असे मानतो. शिक्षणामुळे माणूस सामाजिक बांधिलकी जोपासतो , शिक्षणामुळे माणसाला समाजाबद्दल प्रेम निर्माण होते असेही आपण ऐकतो , परंतु हल्ली परिस्थिती मात्र वेगळी आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीत सामाजिकतेला कुठेच स्थान दिसत नाही . शिक्षण प्रक्रियेतून सामाजिक बांधिलकी पूर्णपणे दुर्लक्षित :- कधीकाळी शिक्षणाची आणि शिक्षकांची आस्था एवढी सुदृढ होती की , विद्यार्थ्यांना उन्नत करून त्यांना स्वावलंबी , प्रामाणिक , इमानदार माणूस बनवण्याची जबाबदारीच गुरुजी , शिक्षकांची होती परंतु आजचे दृश्य विरोधाभास निर्माण करणारे झाले आहे . खऱ्या अर्थाने आजचे दृश्य विपरीत आहे . आज आमचे , शिक्षक आणि प्राध्यापक हे महिन्याचा पगार उचलण्यापुरते मर्यादित झालेले दिसत आहे . आणि विद्यार्थी - विद्यार्थी  तर फक्त पदवीचे ( डिग्री ) प्रमाणपत्र गळ्यात बांधून नोकरीसाठी झुंजत राहण्यापुरतेच मर्यादित झाले आहे.  ...

आरोग्य बिघडणारे शिक्षण

तुम्हाला माझी आणखीन ब्लॉक व्हायचे असतील तर या लिंक वर क्लिक करा.  https://draft.blogger.com/u/1/blog/post/edit/1317193413583215689/9003872123497158672   सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये शारीरिक स्वास्थ्याचा आणि शिक्षणाचा कुठेही संबंध दिसत नाही.  डॉक्टर्स   सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मानवी आरोग्याला महत्व दिले जात नाही मोठ मोठाले प्राध्यापक,वकील, डॉक्टर, इंजिनीअर्स, अधिकारी व तसेच उद्योगपती यांना भरमसाठ पैसा कमावण्याचे ज्ञान आहे परंतु आरोग्याचे कसलेही ज्ञान नाही. असे अनेक डॉक्टर आहेत की ज्या रोगाचे तज्ञ आहेत त्याच रोगांनी ते स्वतःच ग्रस्त आहेत उदाहरणार्थ एखादा डॉक्टर नेत्र विकार तज्ञ असतो पण त्यांना स्वतः चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही, अनेक शुगर स्पेशलिस्टांना शुगरची गोळी घेतल्याशिवाय  भागत नाही, अनेक मूळव्याध तज्ञ दैनंदिन जीवनात मुळव्याधीने त्रस्त आहेत. हा विषय विचार करण्यासारखा आहे याचे कारण त्या डॉक्टरांना आजारांवर उपचार करण्याचे शिक्षण मिळाले परंतु आजारी न पडण्याचे शिक्षण त्यांना मिळालेच नाही. डॉक्टर लोकांच्या जीवनामध्ये या समस्या जर असतील तर इतर लोकांचा ...

खर्चिक आणि महागडे शिक्षण पद्धती

सध्याच्या महागड्या शिक्षण व्यवस्थेने पालकांची अशी थट्टा मांडली आहे  श्रीमंत पालक    1)  आपण थोडसं शिक्षण व्यवस्थेवर नजर टाकली तर असे दिसून येईल की जनसामान्य आणि गरीब लोक यांची या व्यवस्थेने थट्टाच मांडली आहे.  2) आपल्या मुलांच्या वजनाएवढा पैसा ही शिक्षण व्यवस्था पालकांकडून उकळत आहे बालवाडी पासून ते पदवी पर्यंत कोणतेही शिक्षण पैसे ओतल्या शिवाय मिळत नाही.  ही शिक्षण व्यवस्था इंग्रजी बनावटीची असल्यामुळे ती लोकशाहीला घातकच ठरत आहे.  3) इंग्रजी राजवटीमध्ये नेहमीच पुंजीपती, अधिकारी, सत्ताधारी, सावकार, मोठे जमीनदार, नोकरदार नेहमीच राज्य करतात आणि आपल्यापेक्षा अप्रगत दिसणाऱ्या पालक वर्गाला अथवा समाजाला नेहमीच दाबून ठेवतात अप्रगत दिसणाऱ्या समाजाला आणि पालक वर्गाला दाबून ठेवण्याची ही प्रणाली मानवतेच्या आणि समानतेच्या विरुद्ध आहे.  4) जो वर्ग प्रगत आणि शिक्षित आहे त्यांचेच मुले यशाचे मानकरी ठरत आहेत त्यांच्या यशाच्या मुळाशी गेलो तर त्यांचे कारण फक्त पैसा हेच सापडत आहे उदाहरणात एक एमबीबीएस डॉक्टर व्हायच जर असेल तर एक कोटी रुपये मोजावे लागत आहेत. 5)  सामा...

राज्यकारभाराची सदोष पद्धती आणि सध्याची शिक्षण पद्धती

1. गेल्या पन्नास वर्षांमध्ये आपला भारत देश अधिक अधिक गरीब झाला आहे. 2.भारत देशातील माणस स्वतःचं संरक्षण स्वतः  करण्यात अपात्र ठरत आहेत. 3.आपली मुले राष्ट्रभावना विसरताना दिसत आहेत हे सर्व राज्यकारभाराच्या सदोष पद्धतीमुळे घडत आहे . 4. राज्यकारभाराच्या सर्वात सदोष भाग म्हणजे सध्याची शिक्षण व्यवस्था.   ताण तणाव  सध्याच्या शिक्षण पद्धतीवर एक नजर टाकली तर असे दिसून येते की दिवसभर वर्गात बसून कागदी घोडे नाचविणे क्विंटल क्विंटल कागद गिरवणे शिकवलेले घोकंमपट्टी करू करू पाठ करणे आणि वर्षभर केलेली घोकंपट्टी परीक्षेच्या नावाखाली एक दिवस कागदावर उतरवणे आणि निकालाची वाट पाहत राहणे विद्यार्थ्यांसाठी निकालाचा दिवस म्हणजे पास- नापासांचा खेळ बनला आहे. प्रचलित शिक्षण पद्धती ही हा पास - नापासांचा खेळ विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत आहे.  लाखो विद्यार्थ्यांमधून बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी पुढच्या वर्गात बसण्यास पात्र होतात.  उर्वरित विद्यार्थ्यांना सदरील शिक्षण व्यवस्था नापास म्हणून घोषित करते आणि त्या मुलांना आत्महत्येस प्रवृत्त करते. हा विद्यार्थ्यांचा दोष नसून राज्यकारभारातील शि...

गुलामीच्या पिंजऱ्यात अडकवणारे शिक्षण

  प्रचलित शिक्षण व्यवस्था, व्यवस्थेतील सर्वच शिक्षक,अधिकारी आणि विद्यार्थी सगळेच्या सगळे बंदिस्त आहेत.एक गुलाम व्यवस्था संपूर्ण जनसमुदायाला स्वातंत्र्याचे धडे कसे देऊ शकेल? एक गुलाम शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र,स्वायत्त आणि स्वावलंबी होण्याचे अमृतपान कसे देऊ शकेल?  बंदिस्त शिक्षण जरी एखाद्या शिक्षकाला जाणीव झाली तरी तो विद्यार्थ्यांना स्वतंत्र स्वावलंबी होण्याचे शिक्षण देऊ शकणार नाही कारण तो सरकारी नोकरदार आहे आणि त्यांला साचेबद्ध कागदी नियमात बांधलेल्या अभ्यासक्रमाचे ज्ञान देण्याचा आदेश आहे.शिक्षण व्यवस्थेतील शिक्षक गुलामगिरीच्या पिंजऱ्यात असल्यामुळे आणि दडपशाहीत असल्यामुळे अनेक वेळा त्यांना नको असलेली कामे करावी लागतात उदाहरणार्थ असे काही शिक्षक असतात की त्यांचा राजकारणाशी काही संबंध नसतो परंतु त्यांचे संस्थाचालक राजकारणामध्ये असतात त्यामुळे त्यांना राजकीय प्रचारात फिरावे लागते केवळ प्रचारात नाही तर निवडणुकीच्या काळात अनेक छुप्या जबाबदाऱ्या संबंधित शिक्षकावर असतात म्हणजेच हे गुलामगिरीचे ज्वलंत उदाहरण आहे लोकांना दारू पाजवून, मास-मदिरा खाऊ घालून, मूर्ख बनवून, आपली र...

जीवन शिक्षण | https://aviratvidya.blogspot.com

https://www.facebook.com/amol.biradar.9?mibextid=JRoKGi चरित्रहीन पाश्चात संस्कृतीचे शिक्षण  भारतीय संस्कृती    समस्त विश्वाला दीपावणारी अशी भारतीय संस्कृती होती परंतु ब्रिटिश शिक्षण पद्धतीने भारतीय संस्कृती मोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. ब्रिटिश शिक्षण पद्धती पूर्णपणे असहंस्कारीत असून.विद्यार्थ्यांना आणि समाजाला भौतिक वादाच्या भोगविलासाकडे घेऊन जात आहे. ब्रिटिश शिक्षण पद्धतीचा उद्देशच हा आहे की विषमतेला खतपाणी घालणारे आणि विषय वासनेने ओतप्रोत भरलेले जीवन प्राप्त करणे, विषय वासनेने पिसाळलेल्या चरित्रहीन पाश्चात संस्कृतीचे शिक्षण आज आपल्या भारत देशात दिले जात आहे.  ब्रिटिश शिक्षण पद्धतीमुळे भारतीय जन माणसाची जीवनशैलीच बदलून गेली आहे. कधीही उठायचं आणि कधीही झोपायचं, व तसेच काहीही खायचं आणि काहीही प्यायचं. आजारी पडा आणि भरपूर औषध गोळ्या घ्या या त्री सूत्रामध्ये माणसाची जीवनशैली बांधली गेली आहे.  जशी जशी भारतीय माणसाची जीवनशैली बदलत गेली,तशी तशी भारतीय संस्कृती नष्ट होत गेली, मुला मुलींचे सगळेच शाळा, महाविद्यालय  स्वतंत्र नाहीत. शाळा महाविद्यालयांना भारती...

जीवन शिक्षण

भारतीय शिक्षणाचा पूर्व इतिहास .  पूर्वी भारत विश्वाच्या पाठीवर एक वैभवशाली राष्ट्र म्हणून ओळखल्या जायचे. कारण भारत या देशात प्रत्येक माणसाच्या हाताला काम होते. प्रत्येकाच्या मुखामध्ये त्यांच्या त्यांच्या धर्मदेवतांचे नाव होते आणि प्रत्येक गावात स्वावलंबी शिक्षण देणारे कला गुण शिकवणारे वेगवेगळ्या विद्या,वेगवेगळे शास्त्र कृषी, पाणी,माती,वारा,अग्नी, वृक्ष, अवकाश. या सर्वांचे ज्ञान देणारे उत्कृष्ट व्यवस्थापन करणारे शिक्षण, आरोग्य शिक्षण, चरित्र घडवणारे शिक्षण. अशा सर्व समावेश कलांचा समावेश असणारे शिक्षा गुरुकुल प्रत्येक गावामध्ये नियमित चालत असायचे त्यामुळे त्या ज्ञानाच्या जोरावर आपल्या भारत देशातील गावे ही स्वावलंबी आणि स्व ताक्तीने उभे होते. यामुळेच आपला भारत देश या असंख्य गावाच्या ताकतीवर ताठ मानेने उभा  होता. भारत देशाची ताकद मुठभर शहरापेक्षा असंख्य खेड्यामध्ये पसरलेली होती. याचे मुख्य कारण म्हणजे स्वावलंबी गुरुकुल शिक्षण पद्धती.    तरुणांच्या हाताला काम  भारतीय शिक्षण बदलत कसे गेले... जेव्हा इंग्रज व्यापारी म्हणून भारतात वावरू लागले. व्यापारी म्हणूनच गावागावात ...

जीवन शिक्षण

दिनांक -1-12-2024  सध्याचे भारतीय शिक्षण हे लाचार,गुलाम आणि श्रमहीन आहे. व तसेच बेकारी आणि भिकारी निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था भारतामध्ये रुजू झाली आहे. कसलही प्रात्यक्षिक नाही. चुकीच्या परीक्षा पद्धती. चरित्रहीण यंत्रणा. स्वदेशी तत्त्वांचा खूप अभाव आहे. आणि विदेशी कृतींचा प्रभाव आपल्या शिक्षणावर दिसून येत आहे.नवनवीन शिक्षण पद्धती येत आहे हा ही प्रश्न लवकरच सुटेल  आपण अशा करू.                                लेखेक सौ.गायत्री अमोल बिरादार