मुख्य सामग्रीवर वगळा

गुलामीच्या पिंजऱ्यात अडकवणारे शिक्षण

 प्रचलित शिक्षण व्यवस्था, व्यवस्थेतील सर्वच शिक्षक,अधिकारी आणि विद्यार्थी सगळेच्या सगळे बंदिस्त आहेत.एक गुलाम व्यवस्था संपूर्ण जनसमुदायाला स्वातंत्र्याचे धडे कसे देऊ शकेल? एक गुलाम शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र,स्वायत्त आणि स्वावलंबी होण्याचे अमृतपान कसे देऊ शकेल?

 बंदिस्त शिक्षण

जरी एखाद्या शिक्षकाला जाणीव झाली तरी तो विद्यार्थ्यांना स्वतंत्र स्वावलंबी होण्याचे शिक्षण देऊ शकणार नाही कारण तो सरकारी नोकरदार आहे आणि त्यांला साचेबद्ध कागदी नियमात बांधलेल्या अभ्यासक्रमाचे ज्ञान देण्याचा आदेश आहे.शिक्षण व्यवस्थेतील शिक्षक गुलामगिरीच्या पिंजऱ्यात असल्यामुळे आणि दडपशाहीत असल्यामुळे अनेक वेळा त्यांना नको असलेली कामे करावी लागतात उदाहरणार्थ असे काही शिक्षक असतात की त्यांचा राजकारणाशी काही संबंध नसतो परंतु त्यांचे संस्थाचालक राजकारणामध्ये असतात त्यामुळे त्यांना राजकीय प्रचारात फिरावे लागते केवळ प्रचारात नाही तर निवडणुकीच्या काळात अनेक छुप्या जबाबदाऱ्या संबंधित शिक्षकावर असतात म्हणजेच हे गुलामगिरीचे ज्वलंत उदाहरण आहे लोकांना दारू पाजवून, मास-मदिरा खाऊ घालून, मूर्ख बनवून, आपली राजकीय सत्ता निर्माण करणाऱ्या या संस्थाचालकांच्या  प्रचारासाठी एका शिक्षकाला किंवा प्राध्यापकाला आपल्या इमानदारीचा, नीती धर्मांचा,स्वाभिमानाचा, सर्वधर्मसमभावतेचा, नीती मूल्यांचा या संस्थाचालकाच्या राजकीय यज्ञामध्ये होम करावा लागतो  शेवटी एक स्वाभिमानी इमानदार शिक्षक राजकीय संस्थाचालकांचा गुलाम बनतो. शिक्षकांना सरकारचे दडपण, शिक्षण मंत्र्याचे दडपण, अधिकाऱ्यांचे दडपण, संस्थाचालकाचे दडपण, पालकांचे दडपण, राजकीय पुढाऱ्यांचे दडपण अशी कितीतरी गुलामगिरी भोगणाऱ्या  शिक्षकांची भूमिका देशाला विद्यार्थ्यांला स्वतंत्र व स्वाभिमानाचा धडा एक शिक्षक म्हणून कसा देऊ शकेल याचा विचार देखील करवत नाही. अनेक शिक्षकांना संस्थाचालकांच्या घरचे कामेही सांगितले जातात उदाहरणार्थ - संस्थाचालकाच्या घरी पाणी भरणे, त्यांच्या घरातला किराणा भरणे त्यांच्या घरातला भाजीपाला आणून देणे, बर्थडे पार्टीचे काम,लग्न समारंभातली काम असे एक ना अनेक कामे संस्थाचालकाच्या दडपणाखाली एका शिक्षकाला पार पाडावी लागतात. मुळात शिक्षक स्वतःच सरकारने कागदी आराखड्यावर तयार केलेला साचेबद्ध अभ्यासक्रम शिकवतात. त्यामुळे ते स्वतः एक गुलाम म्हणून जगत आहेत शिक्षकांना भानच नाही की स्वतःची स्वतंत्र विचारशैली आणि आकलन शक्ती असते जी अवस्था आज शिक्षकांची झाली आहे तीच अवस्था आज पालकांची झाली आहे.


 जुलमी शिक्षण 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुन्हेगारीला प्रवर्त करणारी शिक्षण पद्धती!

कोयता गॅंग एक भीषण समस्या  कोयता गँग ही एक समाजात भयावह समस्या बनत चालली आहे. त्यामुळे समाजात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत चालले आहे. राजधानी पासून ते  खेड्यापाड्यापर्यंत कोयता गॅंगने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. अनेक गरीब आणि चांगल्या कुटुंबातील मुले सुद्धा कोयता गँगकडे आकर्षले जात आहेत. ही गोष्ट त्या मुलांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी चिंतेचा विषय बनत आहे. * विश्वाला अहिंसेची शिकवण देणारा भारत देश *  एकेकाळी संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध भारत देशात जन्मले. भगवान गौतम बुद्धाने विश्वाला शांततेचा संदेश देऊन जगाच्या पाठीवर भारत देशाची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज लोकं धर्माधर्मात भांडून हिंसेला खतपाणी घालत आहेत भगवान गौतम बुद्धांनी धर्माबरोबरच शांती शिकवली आहे, शांती हाच धर्म आहे.  म्हणून जगाने हृदयापासून भगवान बुद्धाला स्वीकारलं आहे. आजही विश्वभरातून एकच नाद घुमतो की " युद्ध नको बुद्ध हवा "    असे शांततेचे संदेश आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये आज कुठेही दिसत नाहीत पावलोपावली दिसते ती फक्त स्पर्धा आणि स्पर्धा विद्यार्थ्यांना एकमेकांशी...

मकोका म्हणजे काय?

महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम ऍक्ट    मकोका म्हणजे काय ?  मकोका कधी लागतो ?   मकोका कारवाई कुणावर होते .  मकोका कारवाई झाल्यानंतर आरोपीला कोणती शिक्षा होते..   कायदा   https://youtube.com/@avirat.biradar2021?si=UHBCkTgiRKJAmA1m * मकोका म्हणजे काय :-  महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणजेच मकोका होय.  राज्य सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी मकोका कायदा हा करण्यात आला.  मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो.   * मकोका कधी लागतो :-  गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते . पण या संधीचा गैरफायदा घेऊन तो आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो . आरोपीवर अटकेची व तडीपारची देखील कारवाई होते . अशा आरोपींना अटक केली जाते तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास आरोपीवर तडीपाराची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपी मध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आह...

लबाड आणि लुटारू शिक्षण व्यवस्था

सध्या शिक्षण व्यवस्थेमध्ये लबाड , खोटे - नाटे बोलून विद्यार्थी आणि पालक वर्गाला लुटत राहणे हा व्यापारच झाला आहे का ?  शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, पण हे दूध मात्र ज्यांच्याकडे धनाचा साठा भरमसाठ आहे , आणि जो छुप्या मार्गाने शिक्षण यंत्रणेला  देऊ शकतो त्यालाच हे वाघिणीचे दूध दिले जात आहे का ? असा भयानक प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे .  आज समाजामध्ये मुठभर बुद्धिजीवी लोक शिकून सवरून मोठे होत आहेत . परंतु त्यांच्यासाठी आणखीन एक परीक्षा लावली जात आहे . ती परीक्षा म्हणजे धनसंपत्ती परीक्षा !  ज्यांच्याजवळ जेवढा जास्त पैसा त्याची तेवढी जास्त गुणवत्ता ! गुणवत्तेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर त्याचेच नाव  छुप्या मार्गाने जो पैशाच्या गरम नोटा शिक्षण यंत्रणेला नेवून देईल .  वैद्यकीय , अभियांत्रिकी  महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी  वीस पंचवीस लाखापासून करोडो रुपये मोजावे लागतात . जर विचार केला तर खरंच एका विद्यार्थ्यामागे करोडो रुपये खर्च शिक्षण व्यवस्था करते का ? शिक्षण व्यवस्थेने यावर कधी आत्मपरीक्षण केलं आहे का ? अशी लाखो करोडो रुपये भरण्याइतपत सर्वसाधार...