1.गेल्या पन्नास वर्षांमध्ये आपला भारत देश अधिक अधिक गरीब झाला आहे.
2.भारत देशातील माणस स्वतःचं संरक्षण स्वतः करण्यात अपात्र ठरत आहेत.
3.आपली मुले राष्ट्रभावना विसरताना दिसत आहेत हे सर्व राज्यकारभाराच्या सदोष पद्धतीमुळे घडत आहे.
4. राज्यकारभाराच्या सर्वात सदोष भाग म्हणजे सध्याची शिक्षण व्यवस्था.
 |
ताण तणाव |
सध्याच्या शिक्षण पद्धतीवर एक नजर टाकली तर असे दिसून येते की दिवसभर वर्गात बसून कागदी घोडे नाचविणे क्विंटल क्विंटल कागद गिरवणे शिकवलेले घोकंमपट्टी करू करू पाठ करणे आणि वर्षभर केलेली घोकंपट्टी परीक्षेच्या नावाखाली एक दिवस कागदावर उतरवणे आणि निकालाची वाट पाहत राहणे विद्यार्थ्यांसाठी निकालाचा दिवस म्हणजे पास- नापासांचा खेळ बनला आहे.
प्रचलित शिक्षण पद्धती ही हा पास - नापासांचा खेळ विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत आहे.
लाखो विद्यार्थ्यांमधून बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी पुढच्या वर्गात बसण्यास पात्र होतात.
उर्वरित विद्यार्थ्यांना सदरील शिक्षण व्यवस्था नापास म्हणून घोषित करते आणि त्या मुलांना आत्महत्येस प्रवृत्त करते. हा विद्यार्थ्यांचा दोष नसून राज्यकारभारातील शिक्षण व्यवस्थेचा दोष आहे.
 |
हतबल |
लेखक - सौ गायत्री अमोल बिरादार
तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा