मुख्य सामग्रीवर वगळा

आरोग्य बिघडणारे शिक्षण

तुम्हाला माझी आणखीन ब्लॉक व्हायचे असतील तर या लिंक वर क्लिक करा. https://draft.blogger.com/u/1/blog/post/edit/1317193413583215689/9003872123497158672 

सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये शारीरिक स्वास्थ्याचा आणि शिक्षणाचा कुठेही संबंध दिसत नाही.

 डॉक्टर्स 


 सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मानवी आरोग्याला महत्व दिले जात नाही मोठ मोठाले प्राध्यापक,वकील, डॉक्टर, इंजिनीअर्स, अधिकारी व तसेच उद्योगपती यांना भरमसाठ पैसा कमावण्याचे ज्ञान आहे परंतु आरोग्याचे कसलेही ज्ञान नाही. असे अनेक डॉक्टर आहेत की ज्या रोगाचे तज्ञ आहेत त्याच रोगांनी ते स्वतःच ग्रस्त आहेत उदाहरणार्थ एखादा डॉक्टर नेत्र विकार तज्ञ असतो पण त्यांना स्वतः चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही, अनेक शुगर स्पेशलिस्टांना शुगरची गोळी घेतल्याशिवाय  भागत नाही, अनेक मूळव्याध तज्ञ दैनंदिन जीवनात मुळव्याधीने त्रस्त आहेत. हा विषय विचार करण्यासारखा आहे याचे कारण त्या डॉक्टरांना आजारांवर उपचार करण्याचे शिक्षण मिळाले परंतु आजारी न पडण्याचे शिक्षण त्यांना मिळालेच नाही. डॉक्टर लोकांच्या जीवनामध्ये या समस्या जर असतील तर इतर लोकांचा विषय याहीपेक्षा गंभीर आहे. या लोकांना शिक्षित होण्याचे ज्ञान मिळाले परंतु खाण्यापिण्याचे, झोपण्या उठण्याचे, रहाण-सहान, कपड्या लत्याचे ज्ञान मिळालं नाही. बरेचसे आजार ते जे कपडे वापरतात त्या कपड्यातूनच आजार उदभवतात उदाहरणार्थ त्वचाविकार जीन्स कपडे,पॉलिस्टर कपडे. खाण्यापिण्याचे ज्ञान सुद्धा कोणत्याही शाळा कॉलेजात दिले जात नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे हॉटेलचे खाणे आणि मसणात जाणे घरी शुद्ध सात्विक आहार असूनही हॉटेल कडे झुंडच्या झुंड जाताना दिसत आहेत आणि सर्वाधिक बिमारी उदभवण्याचे कारण हे बाहेरील खाणे आणि अवेळी खाने हे ठरत आहे.बहुतांश श्रीमंत लोक जास्तीचा आणि चुकीचा आहार घेतल्यामुळे बिमार पडत आहेत तर बहुतांश गरीब लोक असंतुलित आणि कुपोषित आहाराने बिमार पडत आहेत.एकीकडे अति खाल्ल्यामुळे लोक बिमार पडत आहेत तर दुसरीकडे अन्न मिळत नसल्यामुळे बिमार पडत आहेत.परंतु यामध्ये आहार शास्त्राचे शिक्षण मात्र शाळा कॉलेजात दिले जात नाही.

 बाहेरील खाद्यपदार्थ 
 
    
                                लेखक - गायत्री अमोल बिरादार 

टिप्पण्या

  1. जलमित्र बाबासाहेब एकनाथ गायकवाड१० डिसेंबर, २०२४ रोजी ७:०० AM वाजता

    खूप छान सत्य वस्तू स्थिती आशिच आहे सध्या

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिलात त्याबद्दल...बदल घडवायचे आहेत दादा... अजून खूप लिहायचं आहे सध्या सुरुवात केली आहे 👌

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुन्हेगारीला प्रवर्त करणारी शिक्षण पद्धती!

कोयता गॅंग एक भीषण समस्या  कोयता गँग ही एक समाजात भयावह समस्या बनत चालली आहे. त्यामुळे समाजात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत चालले आहे. राजधानी पासून ते  खेड्यापाड्यापर्यंत कोयता गॅंगने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. अनेक गरीब आणि चांगल्या कुटुंबातील मुले सुद्धा कोयता गँगकडे आकर्षले जात आहेत. ही गोष्ट त्या मुलांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी चिंतेचा विषय बनत आहे. * विश्वाला अहिंसेची शिकवण देणारा भारत देश *  एकेकाळी संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध भारत देशात जन्मले. भगवान गौतम बुद्धाने विश्वाला शांततेचा संदेश देऊन जगाच्या पाठीवर भारत देशाची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज लोकं धर्माधर्मात भांडून हिंसेला खतपाणी घालत आहेत भगवान गौतम बुद्धांनी धर्माबरोबरच शांती शिकवली आहे, शांती हाच धर्म आहे.  म्हणून जगाने हृदयापासून भगवान बुद्धाला स्वीकारलं आहे. आजही विश्वभरातून एकच नाद घुमतो की " युद्ध नको बुद्ध हवा "    असे शांततेचे संदेश आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये आज कुठेही दिसत नाहीत पावलोपावली दिसते ती फक्त स्पर्धा आणि स्पर्धा विद्यार्थ्यांना एकमेकांशी...

मकोका म्हणजे काय?

महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम ऍक्ट    मकोका म्हणजे काय ?  मकोका कधी लागतो ?   मकोका कारवाई कुणावर होते .  मकोका कारवाई झाल्यानंतर आरोपीला कोणती शिक्षा होते..   कायदा   https://youtube.com/@avirat.biradar2021?si=UHBCkTgiRKJAmA1m * मकोका म्हणजे काय :-  महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणजेच मकोका होय.  राज्य सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी मकोका कायदा हा करण्यात आला.  मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो.   * मकोका कधी लागतो :-  गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते . पण या संधीचा गैरफायदा घेऊन तो आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो . आरोपीवर अटकेची व तडीपारची देखील कारवाई होते . अशा आरोपींना अटक केली जाते तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास आरोपीवर तडीपाराची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपी मध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आह...

लबाड आणि लुटारू शिक्षण व्यवस्था

सध्या शिक्षण व्यवस्थेमध्ये लबाड , खोटे - नाटे बोलून विद्यार्थी आणि पालक वर्गाला लुटत राहणे हा व्यापारच झाला आहे का ?  शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, पण हे दूध मात्र ज्यांच्याकडे धनाचा साठा भरमसाठ आहे , आणि जो छुप्या मार्गाने शिक्षण यंत्रणेला  देऊ शकतो त्यालाच हे वाघिणीचे दूध दिले जात आहे का ? असा भयानक प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे .  आज समाजामध्ये मुठभर बुद्धिजीवी लोक शिकून सवरून मोठे होत आहेत . परंतु त्यांच्यासाठी आणखीन एक परीक्षा लावली जात आहे . ती परीक्षा म्हणजे धनसंपत्ती परीक्षा !  ज्यांच्याजवळ जेवढा जास्त पैसा त्याची तेवढी जास्त गुणवत्ता ! गुणवत्तेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर त्याचेच नाव  छुप्या मार्गाने जो पैशाच्या गरम नोटा शिक्षण यंत्रणेला नेवून देईल .  वैद्यकीय , अभियांत्रिकी  महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी  वीस पंचवीस लाखापासून करोडो रुपये मोजावे लागतात . जर विचार केला तर खरंच एका विद्यार्थ्यामागे करोडो रुपये खर्च शिक्षण व्यवस्था करते का ? शिक्षण व्यवस्थेने यावर कधी आत्मपरीक्षण केलं आहे का ? अशी लाखो करोडो रुपये भरण्याइतपत सर्वसाधार...